live mansoon maharashtra : नमस्कार महाराष्ट्र मध्ये मान्सून चे आगमन झाल्याने बळीराजाला आनंद नक्कीच झालेला आहे. आता बळीराजा सह नागरिकांमध्ये आनंद झालेला आहे याचे कारण हि तसेच आहे उन्हापासून सुटका आणि पावसाळ्यातील फिरणे. असो, गेल्या 2 -3 दिवसांपासून मान्सून कोकणात जास्तच सक्रिय झाला आहे. कालपासूनच सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरीमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे.
मान्सून ची प्रतीक्षा होती महाराष्ट्रात एन्ट्री आता त्याची झाली आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
mansoon maharashtra : महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून कोकणात आता मान्सूनच्या सरींना सुरूवात झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झाल्याने बळीराजाची चिंता मिटली आहे. आता बळीराजा सह नागरिकांमध्ये आनंद झालेला आहे
दरम्यान, गेल्या ०५ जून २०२४ पासून कोकणात मान्सून सक्रिय झाला आहे. कालपासूनच रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे.
पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजना मुलींना उच्च शिक्षणासाठी 7.5 लाख रुपये कर्ज ; माहिती पूर्ण पहा.
त्यानंतर आता मान्सून गोवा राज्यात दाखल झालेला आहे.
शनिवार पर्यंत पाऊस रत्नागिरीत दाखल होणार असून मान्सून सक्रिय होण्यासाठी अरबी समुद्रात पोषक वातावरण असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
याचसोबत उद्यापर्यंत तळ कोकणात मान्सून येणार आहे.
कोकणासाठी आज हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. तर अरबी समुद्र किनारपट्टी भागात काळ्या ढगांची गर्दी झाली आहे. गंमतीचा भाग पहा कि रत्नागिरीच्या समुद्र किनार्यावर ऊन आणि सावलीचा खेळ सुरू झालाय.
तर कोकणात शनिवारपासून जोरदार पावसाचा इशाराीही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
